Sunday 15 May 2016

कर्म करण्याच्या वेळी योग्य ती दक्षता न घेणे हे बुद्धिमत्तेच्या अभावाचे पहिले लक्षण अणि जे आपल्या स्वाधीनचे नाही ते मनाप्रमाणे घडले नाही तर खेद करीत बसणे हे बुद्धिच्या हीनतेचे दुसरे लक्षण.
ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।। याचा अर्थ " जी गोष्ट आपल्या हातातील नाही त्या विषयी माणसाने भग्वदइच्छा समजून कोणत्याही प्रकारचा खेद न बाळगून समाधानाने राहिले पाहिजे" असा आहे.